Comprehension

खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञानें। 

समाधान कांही नव्हे तानमानें। 

नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।  

समाधान ते सज्जनाचेनि योगें।।

जीवनामध्ये प्रत्येकजण समाधान मिळविण्यासाठी झटत असतो. समाधानाच्या माध्यमातून त्याला आनंद मिळवायचा असतो. आणि आनंद कायम टिकणारा असावा यासाठी त्याला शाश्वत समाधानाचा ध्यास असतो. अशा तऱ्हेचे समाधान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा मार्ग, श्रीसमर्थांनी या श्लोकात सांगितला आहे. तो स्पष्ट करण्यासाठी असे चिरंतन समाधान मिळावे म्हणून प्रपंची माणसे कोणत्या साधनांचा अवलंब करतात हे त्यांनी प्रथम वर्णन केले आहे. ते मार्ग म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान, कला, योग, याग व त्याग हे होत.

सृष्टीच्या बाह्य व्यापाराचे ज्ञान मनुष्य पंचेद्रियांमार्फत ग्रहण करतो. या ज्ञानामधून त्याला सुख मिळेल अशी कल्पना असते. पण जे ज्ञान पंचेद्रियांवर अवलंबून आहे त्याचे स्थैर्यही त्या पंचेद्रियांच्यावरच अवलंबून आहे.इंद्रिये ही वयोमानाने क्षीण होत जाणारी असल्याने त्यापासून प्राप्त होणारे समाधानही क्षीण होणारे असते ज्ञानमार्गे किंवा तत्वज्ञान चिंतनामुळे मनुष्यप्राणी काही काळ तरी चिरंतन सत्याच्या जवळ जाऊ शकेल व त्याला तेवढ्या काळात तरी समाधान मिळू शकेल. त्याचप्रमाणे गायनादि कलांच्या माध्यमातून ज्याला येथे श्रीसमर्थांनी 'तानमाने' असा गंमतीशीर शब्द वापरला आहे, तो कांही वेळ परमात्म्याच्या जवळ जाऊ शकेल. एखादा श्रेष्ठ गायक मनःपूर्वक गाताना किंवा चित्रकार उत्कटतेने चित्र रंगविताना तेवढ्यापुरते देहभान किंवा 'मी' पणा विसरून जाईल. त्या विशिष्ट वेळी आणि काळी तो परमात्मयांच्या जवळ असेल आणि पूर्ण समाधानांत, निखळ आनंदात राहील. परंतु कलासाधनेचा तो परमोच्च क्षण संपला की त्याचे समाधानही भंग पावेल!

योगाभ्यासाने मनुष्य समाधी अवस्थेपर्यंत प्रगती करू शकेल. समाधी अवस्थेत असताना त्याचे जगाशी भान तुटेल व  ईश्वराशी नाते जोडले जाईल. पण ही समाधी उतरली की ते नाते संपेल व तो आनंद आणि ते समाधानही नष्ट होईल. त्याचप्रमाणे यज्ञयाग करताना उत्कट भावनेने आणि पवित्र आचरणाने याञीक व्रतस्थ राहील. तेथपर्यंतच त्याचे समाधान टिकेल. भोगत्यागे म्हणजे सुखोपभोगाचा त्याग करण्यावरही देश, काळ, समाज यांच्या मर्यादा असतात आणि त्या मर्यादाच त्याच्या समाधानावरील मर्यादा बनतात.

अशा तऱ्हेने वरील सर्व मार्गाने चिरंतन समाधान मिळणार नाही हे सांगून मग श्रीसमर्थ ते समाधान केवळ 'सज्जनांचेनि योगे' म्हणजे संतसज्जनांचा सहवास ठेवल्यानेच मिळू शकेल असे सांगतात. येथे त्यांना अभिप्रेत असलेला संतसहवास म्हणजे केवळ देहाने संतांच्या सहवासात राहणे यांच्या संगतीत असताना आपले मनानेही यांच्याशी नाते जोडून ती संतसंगती संतांच्या मनाची म्हणजे केवळ देहाने संतांच्या मनाची म्हणजे यांच्या सद्विचारांची हेच त्यांना अभिप्रेत आहे. केवळ देहाने संतांबरोबर राहाणारे शिष्य अनेकदा सामान्य माणसाहूनही हीन मनाचे झालेले आपण अनुभवतो कारण त्यांचा संतसहवास मनाने नाही तर फक्त देहाने घडलेला असतो. कारण संतसहवासात साधक जर मनापासून आणि श्रद्धेने राहिला तरच त्याचा 'मी' पणा त्या संतांच्या मोठेपणात विलीन होऊन जातो. त्याचा अभिमान संपतो. संतसहवासामुळे त्याच्यात अमूलाग्र सुधारणा होते. तो सत्संग  कसा असतो याचे वर्णन श्रीसमर्थांनी एके ठिकाणी 'सुखरूप संग सज्जनाचा असे केले आहे. ते यथार्थच आहे. तो सहवास प्रत्यक्ष सुखाचेच रूप आहे. म्हणून साधकाने मनापासून आणि श्रद्धेने संतसमागम करावा आणि खरे चिरंजीव समाधान मिळवावे!

प्रपंची माणूस अवलंब करीत असलेली साधने व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावा.

  साधने    वैशिष्टये 
(a) पिंडज्ञान  (i) गायनादि कलेद्वारा प्राप्त होणारे ज्ञान 
(b) तत्वज्ञान  (ii) समाधी अवस्थेत ईश्वराशी नाते जोडणे व यज्ञादि कर्मात व्रतस्थ राहण्याचे ज्ञान 
(c) तानमाने  (iii) ऐहिक व भौतिक सुखाचा त्याग 
(d) योगमाये  (iv) पंचद्रियांमार्फत मिळणारे ज्ञान 
(e) भोगत्याग  (v) चिंतनातून ईशशक्तीच्या जवळ जाणारे ज्ञान 

This question was previously asked in
MPSC Rajyaseva Prelims 21 Aug 2022 (CSAT) Paper-2 Official Paper
View all MPSC State Service Papers >
  1. (a) - (iv), (b) - (v), (c) - (i), (d) - (ii), (e) - (iii)
  2. (a) - (iii), (b) - (v), (c) - (ii), (d) - (i), (e) - (iv)
  3. (a) - (i), (b) - (iv), (c) - (v), (d) - (ii), (e) - (iii)
  4. (a) - (ii), (b) - (iv), (c) - (v), (d) - (iii), (e) - (i)

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : (a) - (iv), (b) - (v), (c) - (i), (d) - (ii), (e) - (iii)
Free
MPSC Rajyaseva Prelims: General Studies Full Test 1
100 Qs. 200 Marks 120 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

स्पष्टीकरण-

  • शाश्वत समाधान मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा मार्ग, श्रीसमर्थांनी एका श्लोकाद्वारे या गद्यात सांगितला आहे. 
  • केवळ बाह्य इन्द्रियाच्या सहाय्याने मनुष्याला सुख मिळेल अशी त्याची कल्पना असतेपरंतु ते क्षणिक असून संतसज्जनांचा सहवास ठेवल्यानेच ते मिळू शकेल असे सांगतात, खरे सुख मनुष्याला प्राप्त होऊ शकते असा विचार स्वामी समर्थांनी यात मांडलेला आहे.

 

साधने   वैशिष्टये   (a) पिंडज्ञान  (iv) पंचद्रियांमार्फत मिळणारे ज्ञान (b) तत्वज्ञान  (v) चिंतनातून ईशशक्तीच्या जवळ जाणारे ज्ञान (c) तानमाने (i) गायनादि कलेद्वारा प्राप्त होणारे ज्ञान  (d) योगमाये (ii) समाधी अवस्थेत ईश्वराशी नाते जोडणे व यज्ञादि कर्मात व्रतस्थ राहण्याचे ज्ञान  (e) भोगत्याग (iii) ऐहिक व भौतिक सुखाचा त्याग 

 

 अशाप्रकारचा हा क्रम योग्य आहे.

Latest MPSC State Service Updates

Last updated on Jun 12, 2025

-> MPSC Mains Final Answer Key 2025 for State Service is released on the official website.

-> MPSC Mains Admit Card 2025 for State Service is released. Exam on 29 May

-> MPSC has extended the date for online application fee payment. Candidates can now pay the fees online till 23 April, 2025. 

-> The revised exam dates for the MPSC mains exam were announced. The State services main examination 2024 will be held on 27th, 28th & 29th May 2025 as per the revised schedule. 

-> MPSC State service 2025 notification has been released for 385 vacancies. 

-> Candidates will be able to apply online from 28 March 2025 till 17 April 2025 for MPSC State service recruitment 2025. 

-> Selection of the candidates is based on their performance in the prelims exam, mains exam and interview.

-> Prepare for the exam using the MPSC State Services Previous Year Papers.

-> Also, attempt the MPSC State Services Mock Test to score better.

-> Stay updated with daily current affairs for UPSC.

More उतारावाचन Questions

Hot Links: real cash teen patti teen patti rules teen patti game - 3patti poker teen patti rummy